- अभिषेक भोसले सर्व पक्ष निवडणुकीचे उमेदवार जाहिर करण्यात व्यस्त आहेत. याद्यांवर याद्या प्रसिद्ध होत आहेत. वर्तमानपत्रांचे मथळे त्यासंंबधीच्या बातम्यांनी भरून जात आहेत. अशात काही महत्त्वाचे मथळे आपल्या नजरेतून सुटण्याची शक्यता आहे. त्यातला 24 मार्चचा बीबीसी संकेतस्थळावरचा हा एक मथळा ' कांग्रेस सरकार ने छत्तीसगढ़ में अडानी को दिया कोयला खदान का ठेका, उठे सवाल ' आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असतानाची ही महत्त्वाची बातमी आहे. छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातील गिधमुडी आणि पतुरिया इथल्या कोळसा खाणी राज्य सरकारकडून अदाणी समूहाला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे छत्तीसगडमध्ये कॉग्रेसचं सरकार आहे. हो, तेच कॉग्रेसचं सरकार ज्यांनी अदाणी समूहाला सातत्यानं विरोधी पक्ष असताना विरोध दर्शविला होता. राहूल गांधी हे त्या पक्षाचे महासचिव आहेत. कॉग्रसेच महासचिवांनी 2015 मध्ये याच भागाचा दौरा करत तत्कालिन भारतीय जनता पक्षाच्या सरकारला मोठ्या उद्योग समूहांना मदत मुद्दयावरून घेरलं होतं. त्यावेळी त्यांनी भाजप सरकार आदिवासींच्या जमिनी अद...
- अभिषेक भोसले युद्ध आणि त्यात निर्माण होणार्या फेक बातम्या किंवा फोटो ही फक्त आजची समस्या नाहीये. म्हणजे पुलवामा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतरच्या एअर स्ट्राईक नंतर आम्ही माध्यमांनी जी काही खोट्या छायाचित्रांची आणि व्हिडिओ निर्मितीची क्रियटिव्हिटी दाखविली त्याबद्दल शॅम्पेनच्या बाटल्या उडवायचं काही कारण नाही. कारण तुमच्या पूर्वीच खुद्द भारतीय सैन्याच्या माहिती अधिकार्यांनी हा पराक्रम करून दाखविला आहे. एक लक्षात ठेवा, जिथं संघर्ष असतो तिथं बातमी. जिथं संघर्ष असतो तिथं पराक्रम, शौर्याच्या कथा जन्माला येतात. पण त्या शौर्याची मोनोपॉली जेव्हा निर्माण करायची तेव्हा तशा बातम्या, छायाचित्रं आणि व्हिडीओ माध्यमात पेरावे लागतात. अर्थात हे शौर्याचं राजकारण असतं. जेव्हा संघर्ष चालू असतो तेव्हा थेट सीमेवरून वार्तांकन करण्याला मर्यादा असतात. त्यावेळी युद्धासंबंधी सैन्याकडून होणार्या ब्रिफ्रींग किंवा पत्रकार परिषदा ह्या युद्धात घडणार्या घडामोडींसंबंधीच्या एकमेव विश्वासार्ह स्त्रोत मानल्या जातात. पत्रकार परिषदांमधून तुमच्या समोर येणारी माहिती ही सुरक्षा, आंतरराष्ट्रीय धोरण आणि त्या...